मुंबईत आज सकाळी अकरा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान विविध ठिकाणी हे आंदोलन होणार आहे. आतापर्यंतच्या मूक मोर्चांत मराठा समाजाने अहिंसा व संयम यांचा आदर्श जगाला घालून दिला आहे. त्यामुळे संपूर्ण समाजाने या आचारसंहितेचे पालन करूनच चक्काजाम आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने केले आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज (मंगळवारी) राज्यभरात 'चक्काजाम' आंदोलन होणार असून, क्रांती मोर्चाप्रमाणे अहिंसक मार्गानेच हे आंदोलन शांततेत करावे, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाने आज केले.